गौरी, गौरी कुठे आलीस ...?

Author: Rasika Mahabal / Labels: , ,



इतक्यात शोभा चित्रे च गौरी, गौरी कुठे आलीस ...? हे पुस्तक वाचल
हे पूस्तक 'मौज' ह्या दिवाळी अंकातून आणि अन्य नियतकालिकांतून प्रसिध्द झालेल्या ललित लेखांचा संग्रह आहे.
पूस्तकातील सर्व कथा लेखिकेच्या परदेशातील वास्तव्याशी निगडीत आहेत. सर्वच कथा सुंदर आहेत. मी प्रत्येक गोष्टीमधे कुठे ना कुठे तरि रीलेट करु शकले.

जस की एका ठिकाणी लेखिका म्हणते:

"तेवढ्यात एक पाकोळी कुठूनशी मनात भिरभिरते. भोवती जमवलेला हा एवढा सारा गोतावळा आणि आपण यांत शेवटी समान काय? या जमलेल्या किती लोकांशी आपली तार मनापासून जुळतेय? गोड गोड बोलणारे अन आतमध्ये दुसयाच भावना जपणारे काही. तरीहि नित्यनियमान तोंडात खडीसाखर ठेवून आपल एकत्र येण!"

मला वाटायच की मीच आपली मैत्रिसारखी गोष्टसुध्दा कठिण करते आहे; खुप चुझि वागुन. एखाद्या व्यक्तिबरोबर तारा जुळल्या नाहीत तर मी निव्वळ औपचारिकता म्हणून कधिच भेटत नाही; कितीही एकलकोंडेपणा वाटला तरी पण. गरज आहे म्हणून किंवा करायला दूसर काहिच नाही म्हणून वेव्हलेंथ जमत नसलेल्यांबरोबर सुध्दा उगीचच वेळ दवडणे म्हणजे वेळ वाया घालवणेच नाही का? ते मला जमत नाही म्हणुनच जे लोक कोणाशीही संभाषण करु शकतात,ज्यांना मित्रपरिवार जमवायला फारशी आवड निवड नसते त्यांना मी लकी मानते: मैत्रिसारखी गोष्ट कदाचीत साधी सरळ आणि सोप्पीच ठेवायला हवी.

खालील वाक्यात लेखिकेने दर्शवलेला विरोधाभास मला खुप आवडला:

"स्वत: इतकच ब्रिटीश लोक दुसयांच स्वातंत्र जपतात म्हणे. मग दीडशे वर्ष आपल्या देशात राहून काय आपल स्वातंत्र जपल का? स्वत:च्या व्यक्तीगत स्वातंत्र्याच स्तोम माजवणारया या इंग्लिश लोकांनी जगभरच्या किती लोकांच राजकीय स्वातंत्र लुबाडल, पायदळी तुडवल, त्यांच व्यक्तिस्वातंत्र्य नष्ट केल."

'ट्रेझर चेस्ट' कथा मला खास करून आवडली. मला वाटत सर्वांच्याच घरात असे पेटारे असतील ज्यात आपण आपल्याला न लागणार सामान वर्षा नू वर्ष भरत राहतो आणी एक दिवस त्याच्यातून काहितरी काढण्याची वेळ येते आणि तो एक ट्रेझर हंट्च होतो. अनेक वर्षांपासून दडलेल्या ह्या मालमत्तेत खरच काही महत्त्वाच सापडत असेल तर त्या आहेत आठवणी. इथे अगदी मोजकच सामान आहे माझ्याकडे, पूण्याला ह्या वर्षी गेल्यावर मी नक्कीच हा ट्रेझर हंट करणार आहे. माधूरी दिक्षीत, देव आनंदची गाणी असलेल्या व्हिडीओ टेप्स, कदाचित व्हिडीओ टेप्स चा एक खजानाच सापडेल मला - टॉम अँड जेरी, चित्रहार, अनेक जुने पिक्चरस. जुने फोटोज, काहीतरी लिहुन ठेवलेल्या चिठ्ठया चपाट्या, पत्र, ग्रिटिंग कार्डस, गाण्यांच्या ऑडिओ कॅसेट्स, प्रचंड प्रमाणात पूस्तक, ज्योतिष शिकत असतांना शेकडो लोकांच्या अभ्यासाकरता जमवलेल्या पत्रिका, ज्योतिषाची पूस्तक, अगदी लहानपणापासून बनवलेली पेंटींगस - त्यात कूत्री, मांजरी, मिकी माउस अशीच अधिक असणार, विविध मासिकांमधून आलेले सल्मान चे व्यवस्थित कापलेले फोटोज... काय काय गोष्टी सापडतील ह्याची उत्सुकताच आहे.

लेखिकेला सारखे जे अमेरिकन संस्क्रुतीचे धक्के बसत असतात तसे मला पण जाणवतात. अमेरिकेतील भारतीय मुलांची लग्न हा विषय लेखिकेने उत्क्रुष्ठरित्या हाताळला आहे. काही मुलांचे आई-वडिल मुली शॉर्ट लिस्ट करुन ठेवतात आणि मग मुलगा येउन प्रत्येक मुलीला एक एक वेळेस भेटतो आणि पसंती देतो. एकमेकांच खरच जुळणार आहे का हे एका भेटीत कळत नाही आणि त्यामुळे कधी मुलीची तर कधी मुलाची फसवणुक होते. सहसा लेखिका जसे विषय हाताळतात की प्रेम, नाती, दु:ख इत्यादी त्याहून शोभा चित्रे ने फार वेगळे व प्रगल्भ विषय मांडले आहेत. तिचा कॅंम्पिंग वरचा लेख वाचून तर मला कधी एकदा उन्हाळा सुरु होत आहे आणि कधी एकदा मी गाशा गुंडाळून कॅंम्पिंगला जाते अस झाल. निसर्गाच खुप लोभस वर्णन लेखिकेने केल आहे.

"कालचा सुर्यास्ताचा उत्सव रमणीयच होता. त्या तांबड्याभडक सूर्याची किरण लाटांवर, अगदी थेट किनारयापर्यंत पसरलेली. जणू तो सूर्य पाण्यात विरघळतोय आणि त्याचा रंग त्या पाण्याला लागतोय. विलक्षण अशा सोनेरी-तांबूस तेजान सगळ आसमंत झळाळून उठल होत. मावळता मावळता हा रंगांचा सोहळा आमच्या मनावर गोंदवणारा तो आदित्य आम्ही अनिमिष नेत्रांनी पाहत होतो."

मुलांना दत्तक घेण्याची आणि दत्तक गेलेल्या मुलांची सुध्दा बरयाचश्या केसेस मधे कशी कुचंबणा होत असते हे लेखिकेने एका लेखात छान नमुद केले आहे.

थोडक्यात हे पुस्तक जरूर वाचा.

अवकाश - सानिया

Author: Rasika Mahabal / Labels: , ,



पूस्तकं वाचतांना नवे विचार गवसतात, नवी वाक्ये सापडतात, जीवनाचा अर्थ नव्याने जाणवतो. मग अश्यावेळी इतर कोणाशीच संवाद साधण नकोस वाटत, आपला आपल्याशीच संवाद सुरु असताना बाहेरील व्यत्यय नकोसा होत असतो. ही अस्वस्थता कसली असते? कथेमधे कधीतरी कोठेतरी आपल्याला आपणच सापडत असल्याची भावना की अगदी याच अश्याच परिस्थितीत आपण कसे वागलो असतो याची उत्सुकता? काही लेखक, लेखिका आपल्याला असेच झपाटुन टाकत असतात.

इतक्यात सानिया नावाच्या लेखिकेच अवकाश हे पूस्तक वाचल.

सानियाच्या लिखाणाची पध्दत मला आवडली. पूस्तक वाचतांना सोडवले नाही पण पूस्तक वाचून झाल्यावर असे वाटले की ही गोष्ट 'माहेरची साडी' वगैरे साचा मध्ये येते. ज्यात नारी ही दुर्बल आणि अतिशय सहनशील असा समाजाचा घटक दाखवतात... आणि ती तशी असल्याबद्द्ल तिला थोर म्हणवलेली असते. 'बंदिनी स्त्री ही बंदिनी, ह्रुदयी पान्हा नयनी पाणी जन्मोजन्मीची कहाणी!'...

जगातल्या कुठल्यातरी कोपरय़ात ते सत्य पण असेल ह्यात काही शंका नाही. पण सुरुवातीपासूनच जान्हवी धाडसी, महत्त्वाकांक्षी दाखवली आहे. ती अचानक आयुष्यातील दु:खांनी खचून जाते. जस की जान्हवी च्या भावाचा अकस्मात मृत्यू होतो आणि ह्या प्रसंगानंतर तिचे वडिल अंथरुण पकडतात आणि कोणाशी बोलत नाहीत, पण जान्हवी त्यांना बोलत करण्याचा किंवा माणसात आणण्याचा प्रयत्न पण करतांना दाखवलेली नाहीये.

ज़ान्हवीचे लग्न तिच्या मर्जीविरुध्द लावून देतांना सुध्दा ती पाहीजे तेवढा विरोध करत नाही. तिच्या मर्जीविरूध्द लग्न होत पण ह्यात तिच्या नवऱ्याचा काय दोश? त्याच आयुष्य का ती बरबाद करते. त्याच्यासुध्दा काही आशा, आकांक्षा असतील त्या लेखिकेने सोयिस्कररित्या दुर्लक्षीत करून जान्हवीला महान करार दिला आहे.

मनाविरुध्द गोष्टी घडत असतांना त्याच्यावर काही कृती करायची नाही आणी मग माझ नशिबच फूटक अस म्हणून रडत बसायच ह्याला काय अर्थ आहे. तिच्या आयुष्यातले प्रश्न एवढे मोठे नसतात की त्यांना ती सामोरी जाऊ शकली नसती पण उगीचच एकाच व्यक्तीच्या वाट्याला कशी जगातली सर्व दु:ख येतात आणि मग ती व्यक्ती बिच्चारी कशी खचून जाते अस वगैरे दाखवून उगीचच सहानुभुती मिळवण्याचा नाहक प्रयत्न केला आहे.

त्या प्रयत्नांना लेखिकेला सुरुवातीला यश पण मिळाल आहे, म्हणजे अगदी मला गळे काढून रडवण्यापर्यंत यश आल आहे :) पण काही वेळाने जान्हवीच so called bold and beautiful character माझ्या डोक्यात जाऊ लागल. अर्थात हे माझे विचार आहेत. मी जान्हवीशी relate करू शकले नाही, आम्ही दोघी अगदी विरुध्द व्यक्तिमत्वाच्या असल्याने असेल कदाचित. अर्थात ही कथा कुठल्या काळाची दाखवली आहे त्याला सुध्दा महत्त्व आहे. तो काळ बंड पूकरण्याचा नसेल कदाचित.

मला काही गोष्टी खटकल्या ह्याचा अर्थ तुम्हाला सुध्दा खटकतील असा होत नाही.

हे पूस्तक का वाचा?

त्यातील भाषेसाठी, लिखाणाच्या शैलीकरता. पूस्तक एकदम छोट आहे, त्यातील कथा खूप जलद गतीने पुढे जाते, प्रत्येक क्षणाला पुढे काय घडणार ही उत्सुकता कायम ठेवते, जीवनात येणारे काही प्रसंग, नाती लेखिकेने चांगली टिपली आहेत.