रंगपंचमी - व.पु. काळे

Author: Rasika Mahabal / Labels: , ,



कस कोणी इतक प्रतिभाशाली असु शकत, कस कोणी एवढ सुंदर लिहु शकत. आपल्या लिखाणातून लोकांना हसवत, रडवत, चिड आणत तर कधी जीव भांड्यात टाकत. कस कोणी त्यांच्या लेखांमधून वाचकांना डोळ्याची पापणी बंद न करता वाचावयास भाग पाडत. वाचकांना स्वतःच्या भाषाशैलीत भिजवत, मोहक विचारांनी रंगवत, आपल्या दिलखुलास गोष्टींमधून ओलचिंब करत.

एकाच रंगाच्या जश्या अनेक छटा असतात तश्या लिखाणाच्या विषयांच्या अनेक छ्टा असलेल्या माझ्या प्रिय स्व.व.पु. काळेंना माझा साष्टांग नमस्कार. त्यांच्या लिखाणावर प्रेम बसुन त्यांची नित्सिम भक्त होण्यास त्यांच एकच पुस्तक पुरेस होत. वपुंच्या भक्तांकरता ती पोथीच आहे. पुस्तकाच नाव आहे - वपुर्झा.

जगातले सर्वच अनुभव स्वतःने घेणे अशक्य आहे. लोकांच्या अनुभवांबद्द्ल वाचून आपल्याला एक निराळच आयुष्य जगता येत. निरनिराळ्या लोकांच्या सुख, दुःख, त्याग, राग, मोह, इर्षा, यश, अपयश, चिकाटी आणि काहि जगावेगळ्या अनुभुतींमधून वेगवेगळ्या पैलुंची प्रचिती होते.अर्थात तुम्ही काय वाचता ह्यालासुध्दा महत्त्व आहे. कधी कधी पुस्तक तुम्हाला भारावून टाकतात तर कधी ती तुमचे त्यक्तिमत्त्व व विचार बदलण्यास कारक ठरतात. त्यामुळे योग्य पुस्तक वाचण हे आपल्याच हातात असत.

इतक्यात ’रंगपंचमी’ नावाच वपुंच पुस्तक वाचल. नावाप्रमाणेच हे तुम्हाला भिजवून, रंगून टाकेल.

रंगपंचमी ही त्यातील माणसांच्या उत्साही सहभागामुळे आणि विविध रंगांच्या उधळणीमुळे साजरी होते.
आयुष्यात वेगवेगळ्या टप्प्यांवर वेगळीवेगळी माणसे आपल्याला सामील होतात. हे पुस्तक वपुंच्या आयुष्यात आलेल्या माणसांवर आहे, ज्यांनी त्यांना बहरायला, फुलायला, रंगीबेरंगी करायला हातभार लावला. त्यातील प्रत्येक माणसाचे रंग निराळे, कधी शहाणपणाचे, कधी वेडेपणाचे, उत्साहाचे तर कधी नैराश्याचे. वपुंची छोट्या छोट्या प्रसंगांनी रंगलेली ही रंगपंचमी तुम्ही नक्कीच एंजॉय कराल.

0 comments: