एका मुंगीचे महाभारत

Author: Rasika Mahabal / Labels: , , ,

प्रत्येक भाषा सुंदर असते, प्रत्येक भाषेच्या गमती जमती असतात. कुठलीही भाषा कदाचित तेव्हा एन्जॉय करता येते जेव्हा त्याचे अगदी गावराण रुपांतरापासून प्रदेशाप्रमाणे डायलेक्ट तुम्हाला कळतात.

विदर्भातली मराठी, गावाकडली मराठी, पुण्यातली अस्सल पुणेरी मराठी, कोकणातली मराठी आणि ह्या सर्वीकडील लोकांच्या निरनिराळ्या तरहा - खाण्यापासून वागण्यापर्यंत मला माहीत असल्याने मराठी पुस्तक मी सर्वात जास्त एन्जॉय करते.

मला मराठी समजत नसती किंवा वाचता आली नसती तर मी आयुष्यात काय मिस केल असत? खर तर काहीच नाही - पु.ल. देशपांडे सोडल तर! पु.लंची सर्वच पुस्तक सुंदर असली तरी बटाट्याची चाळ सर्वात सुंदर आहे.
वपु, सुहास शिरवळकर ह्यांची सर्वी पुस्तक मी मिस केली असती. मराठी भाषेचा अस्सल आस्वाद कवितांमधून लुटता येतो. शांता शेळके, मर्ढेकरांपासून अगदी आत्ताआत्तापर्यंतचे कवी किशोर कदम.

मला अजुन भाषा कळाल्या असत्या तर बर झाल असत कारण त्या न समजुन मी बरचस लिटरेचर मिस करते आहे. २०१२ मधे हिंदी पुस्तक वाचण्याचा प्लॅन आहे.

इतक्यात गंगाधर गाडगीळांच एका मुंगीचे महाभारत हे पुस्तक वाचल. त्यांची मी इतर कुठलीही पुस्तक वाचली नसल्याकारणाने त्यांना व्यक्ती म्हणून किंवा त्यांच्या आयुष्याबद्दल जाणून घेण्याची जिद्न्यासा मला नव्हती. पण तरीदेखिल हे पुस्तक मला खुप आवडल. काही आत्मचरित्र तुम्हाला प्रोत्साहित करतात जस की इडली ऑर्किड आणि मी, काही अवाक करतात जस की कोल्हाट्याच पोर, तर काही वाचल्यावर वाटत ह्या व्यक्तीने आत्मचरित्र का लिहाव? जस की नाच ग घुमा, काही आत्मचरित्रांशी तुम्ही रीलेट करु शकता, तसच हे पुस्तक माझ्याकरता होत.

ब्रिटीश काळातील मुंबई, तिथली लोक, मराठी लोकांचे इतर भाषीयांशी संबंध, तेव्हाच राहणीमान, कॉलेज लाईफ, कॉलेज विद्यार्थांकडून होणारया ब्रिटीशांविरुध्द चळवळी, तेव्हाच्या पुढारयांबद्दलचे विचार आणि हे सर्व एका कॉमन मॅनच्या द्रुष्टीकोनातून.

लिखाण ही माझी प्रचंड आवडीची गोष्ट आहे, त्याकरता मी रोज आवर्जुन वेळ काढते. लिहिल्याशिवाय मला दिवसाच पुर्णत्व जाणवत नाही. लिखाणावर तेवढच प्रेम करणारे गाडगीळ, त्यामुळे लिखाणासाठी येणारा मेंटल ब्लॉक, वेळ न मिळाल्यास होणारी चिडचिड, येणारी डिसट्रॅक्शन्स इत्यादींबरोबर व एक आयुष्याचा आराखडा व कौटुंबिक जीवन ह्या गोष्टी पण मला समान वाटल्यात. त्यांच्या आयुष्यातील अनंत डीटेल्सने मी बोर पण झाले. पुस्तक खरोखरच महाभारतासारख जाडजुड आहे. पण त्यांची अजुन पुस्तक मी वाचेन की नाही मला शंका आहे कारण वपु, सुशि ह्यांच्यासारख भाषेवरील प्रभुत्व मला जाणवल नाही. पुस्तक अवांतर डीटेल्स स्किप करुन वाचण्याकरता नक्कीच वर्थ आहे.