दोन प्रवासी

Author: Rasika Mahabal / Labels: , ,



गोष्ट आहे दोन व्यक्तिंची
पहिला व दुसरा ही नावे त्यांची

त्यातील एक असे खुप महत्त्वाकांक्षी
आयुष्यातील छोट्या सुखांना तो त्याकरता बक्षी
दुसरा नसे यत्किंचीतही महत्त्वाकांक्षी
आनंद त्याचा वारा, समुद्र व त्यावरील पक्षी

मैत्री जमली दोघांची घनिष्ठ
बघु कोण होते त्यामधील कनिष्ठ

निघाले एक दिवस दोघे लक्ष घेऊन काशी
पहिल्यास होती ती गाठायची जरी राहिलेत ते उपाशी
दुसरयास येणारा प्रत्येक क्षण ठेवायचा होता मनाशी
एकच लक्ष पण विरुध्द व्यक्तिमत्त्वाचे हे दोन प्रवाशी

दुसरा आनंदे जेव्हा उमले कळी
किंवा कुठुनशी सरपटतांना दिसे अळी
आकाशी उठे निरनिराळ्या छटांची जाळी
पहिल्यास कळे ह्यातील धुंदी जेव्हा बघे तो दुसरयाच्या भाळी

नसे उरत दुसरयास वेळेचे भान
जिथे बघी तो फुले पाने किंवा रान
बस तिथेच मारी तो ठाण
नव्हती पहिल्यास ह्यातील काहीच जाण

पहिला म्हणी दुसरयास निघु इथुन लवकर
हे सर्व करण्यास पाहिजे तर येउ नंतर
काशी येण्यास पार करायचे आहे बरेच अंतर
ध्येयपुर्तीची मस्ती असते खुप चिरंतर

सारखाच घेत बसलो आपण जर विसावा
तर अंत नाही ह्या प्रवासा
स्वप्नपुर्तीची उन्मत्तता न येई तुझ्या निवासा
छोट्या गोष्टींतुनच मिळत असे तुला दिलासा

अजुन विचार करताय कोण होते श्रेष्ठ कोण होते कनिष्ठ?

पहिला एकटा असता तर भलेही गाठली असती त्याने गंगोत्री
दुसरा एकटाच बघत बसला असता रम्य रात्री
पहिला मुकला असता पण छोट्या सुखांस
आलीच नसती काशी दुसरयाच्या नशिबास

एकमेकांना पुरक होते हे दोन सोबती
एक दुसरयाच्या नादाने सर्वी सुख त्यांना लाभती
एकाच ध्येयाचे एकत्र हे प्रवासी
असतील तुमच्याही घरात असे दोन रहिवासी

पुस्तके

Author: Rasika Mahabal / Labels: , , ,

महाराष्ट्र देशा - उद्धव ठाकरे

महाराष्ट्रात एवढी सुंदर ठिकाण आहेत ह्याचा अविष्कार झाला. अज्ञानात सुख असते म्हणतात ते खर आहे, कारण पुस्तक वाचल्यापासून मला त्या सर्व ठिकाणांना भेट द्यावी वाटत आहे.
काही फोटो बघून अवाक व्हायला होता. गुड जॉब ठाकरे!





आणि तरीही मी! - सौमित्र

अनार्थातून अर्थ काढलेत
अर्थातून अनर्थ (रीड डबल मीनिंग)
काहीतून घडला अविष्कार
काहींवर घालावा वाटला बहिष्कार, अशा कवितांमध्ये काहीतरी सखोल गहिरा विचार असावा व तो समजायची आपली कुवत नसावी असा विचार करून सोडून दिल्या
एवढे सर्व घडले 'आणि तरीही मी!' संपूर्ण वाचून काढले.

फेब्रुवरी २०१२

Author: Rasika Mahabal / Labels: , , , , , ,


चतुर्भूज - व.पु.काळे

तस पाहील तर लघुकथा लिहिण अवघड काम आहे, ४ पानांच्या गोष्टीतून कथा पात्र उभ्या करुन त्याची वाचकाला भुरळ पाडण क्लिष्ट काम आहे. मला लघुकथा लिहायला व वाचायला खुपच आवडत, हॉलीवूड व बॉलीवूड सिनेमातील फरकाप्रमाणे वाटत. १.५ तासात संपू शकणारा सिनेमा फालतू गाणी, कॉमेडी सिन्स ने भरवून ३ तास दर्शकांचा अंत बघितल्यासारख, अर्थात सर्वच कथा लघू असू शकत नाहीत जस की इम्मॉर्टल्स ऑफ मेलूहाला खंडच्या खंड कमी पडतील.
’जो उन्हातून वणवण फिरलाय तो सावलीतल रहस्य ओळखतो. ज्यान मरण जवळून बघितल आहे त्याला जीवन कळत.’
निरनिराळी व्यक्तीचित्र व.पुंनी त्यांच्या कथांमधून मांडली आहेत. ह्या गोष्टींच मेतकूट त्यांना छानच जमल आहे. आय थिंक इट इज वपुज वन ऑफ द बेस्ट.


गणगोत - पु.ल. देशपांडे
पुलंच्या आयुष्यात आलेल्या विविध व्यक्तिचित्रांवर पुस्तक आधारित आहे, मला त्यातील व्यक्तिचित्रणांनी फारसे प्रेरित केले नाही!तुम्हाला केल्यास बघा...

आभाळ - शंकर पाटील
गावाकडल्या गोष्टी लिहिण्याकरता पाटील प्रसिध्द आहेत. मला त्यांची भाषा व गोष्टी दोन्ही भावल्या नाहीत. (मी स्वत: खेड्यापाड्यातून वाढ्ले असुनही). गावाकडच्या आयुष्याचा सार चांगल्या रितीने मांडणारे अजून कोणी लेखक आवडीचे असतील तर कळवा.

आपुलकी - पु. ल. देशपांडे

Author: Rasika Mahabal / Labels: ,





मराठी भाषेच ज्ञान असलेल्यांनी पुल वाचल नसेल तर मराठी समजण्याच्या सर्वात मोठ्या फायद्यास ते मुकले आहेत.
पु. लंची ख्याती मी काय लिहावी. त्यांच्या प्रत्येक पुस्तकातून आणि प्रत्येक वाक्यातून ते पुन: पुन: प्रभावित करतात. हे पुस्तक त्यांच्या आयुष्यात आलेल्या निरनिराळ्या लोभस व्यक्तिमत्त्वांवर आहे. त्यातील एकाही व्यक्तीबद्दल मला अ का ब माहीत नसतांना त्या माझ्या मनात तरंग उठवून गेल्यात. आपुलकीने लिहिलेल हे पुस्तक त्यातील चरित्रांबद्दल आपुलकी निर्माण करुन जाते.

ही वाट एकटीची - व पु काळे

Author: Rasika Mahabal / Labels: , ,

महाराष्ट्र पुरस्कार लाभलेल पुस्तक. जीवनातील तत्वांशी जास्तच चिकटलेल पात्र वपुंनी उभ केल आहे. प्रत्येक गोष्टीतील पात्रांच एक वेगळ आयुष्य, आगळे वेगळे विचार असतात आणि तस त्यांना वागण्याचा लेखकाने अधिकार दिला असला तरी ती पात्र वाचकांना नकोशी होवू शकतात. कधी कधी पुस्तकातील पात्रांचा वैताग आला की पुस्तक वाचु नये अस वाटत. तसच माझ झाल. शेवटी वाटेवर ती एकटी राहिली ते साहजिकच होत आणि बर झाल एकटी राहिली अस वाटून गेल.

आजीचा बटवा आणि झाडाखालची फुल वेचणारे आजोबा...

Author: Rasika Mahabal / Labels: , , , , , ,


तिथल्या सकाळच्या फेरफटक्यात सुर्याच्या पहिल्या किरणापासून उत्साह झळकतो. झाडाच पान आणि पान जणू आनंदात डूलत, पक्षी सकाळच्या सुर्यकिरणांच्या आगमनात गातात, वारा थंडावा निर्माण करण्याच्या प्रयत्नात गुंततो. आसमंत खुलतो, त्यासोबत माझ मनही झुलत, पाखरांसारख चहुओर भिरभिर उडावस वाटत, झाडासारख निपचित पडून सुर्यप्रकाशात पहुडावस वाटत. सर्वीकडे शांतता, प्रसन्नता, निर्मलता. दुरुन कुठुनसा मंदिराच्या घंटांचा नाद तर कधी ऐकू येते त्यास आरत्यांची साथ, उदबत्त्यांचा वास... प्रत्येक सकाळ बेभान करते अगदी सकाळ पेपरसुध्दा.

सकाळी रिकाम्या रस्त्यावर तर कधी पर्वती; लॉ कॉलेज टेकडीवर मारलेला फेरफटका, घरी येइपर्यंत होणारी वर्दळ, रिक्षावाल्यांनी बिल्डींग खालून मारलेल्या पोरांच्या नावाने हाका, कूठे भाजीवाले, फेरीवाल्यांच्या आरोळ्या, हॉर्नचे आवाज, कचरा घेणारे, पेपरवाले, दुधवाल्यांची वर्दळ. कूकरच्या शिट्ट्या, आमटीचा वास, शाळेत जाणारयांची, ऑफिसला पळणारयांची एकच चेहेलपेहेल. हळूहळू पॉप्युलेशन, पोल्युशन, ट्रफिकच्या राक्षसांच रुद्र रुप जाणवत.
दुपारच्या कडक उन्हाच्या मारयात घराघरात घुइघुइ फिरणारे सिलिंग फॅन्स, कूठूनसे येणारे जेवणाचे खमंग वास, मग कामवाल्या बायकांची एकच रांग, एवढ्या प्रकाशात प्रकर्शाने जाणवतात ते भडक रंग बिल्डींग्सपासून लोकांच्या कपड्यांपर्यंत. जरा थोडा वेळाची शांतता मिळते न मिळते तोच शाळेतून घरी आलेल्या मुलांचा कॉलनी मधे धुमाकूळ, घराघरातून येणारे मराठी सीरीयल्सचे आवाज. निजानीज झाली की काळोख्या रात्री रस्त्यावर पसरलेल कूत्र्यांच साम्राज्य, मांजरांनीसुध्दा बंड पुकारुन त्यांना दिलेला प्रतिसाद... शुभ्र चांदण, रस्त्यांवरून स्ट्रीट लाइटसचा लख्ख प्रकाश, त्यावर झेपावून रातकिड्यांची आत्महत्या...हवेतील गुलाबी थंडी, निर्मनुष्य वेळ एन्जॉय करत पडलेल्या निपचीत वाटा.

करप्शन, कचरा, गरीबी हजार प्रॉब्लम्स असले तरी आठवतो तो विजांचा थयथयाट, पावसाचा टिनावर पडलेला रपारप आवाज, मातीचा पहिल्या पावसानंतर येणारा सुवास, चुलीखाली लाकड जाळून पाणी तापवणारया बायांचा त्रास, रस्त्यावर भाजलेल्या कणसाचा वास, उसाच्या गुरहाडाचा आवाज, भाविकांची भक्ती, आईची माया, रस्त्याच्या मधे रवंथ करत पडलेल्या गाई त्यांना डिस्टर्ब न करता येणारया जाणारयांची घाई, तर कधी ह्या रसिका करता ४ केळी घेऊन भेटायला आलेली जुनी कामवाली बाई.

लक्षात राहतो आजीचा बटवा आणि झाडाखालची फुल वेचणारे आजोबा...