. एक होता पाऊस .

Author: Rasika Mahabal / Labels: ,


आपल्या सगळ्य़ांनाच तो आवडतो. त्याच्या बरसण्याआधी आसमंत खुलतो. हळूवार गार वाऱ्यासोबत वेली, पान, फुल मंद झुलतात. त्याच्या आगमनाकरता पक्षी किलबिलतात. थेंबथेंब तो बरसतो, ओंजळित  साठलेला तो हाताला अलगद स्पर्श करुन ओघळतो.

त्याच्या ह्या सर्व करामती मला लहान बाळाचा सहवास वाटतात. बाळाचा सुवास, त्याचा मऊसूत स्पर्श, त्याच हसर बेफिकीर अल्लड रुप सगळ कस त्या हळूवार पावसाप्रमाणे असत.

असा तो खेळकर आल्हाददायी बरसत रहातो. मग सुरु होतो विजांचा कडकडाट, त्याच रपारप कोसळण, धरतीवर विजयश्री मिळवल्याचा त्याचा हा हास्यकल्लोळ . त्याच ते उन्मत्त आक्राळविक्राळ रुपांतर! वाटत त्याचा तो गोजिरेपणा गेला कुठे?

नुकत्या यौवनात प्रवेश केलेल्या युवकाप्रमाणे त्याच हे वागणं भासत.

गरजून बरसून डोंगराच्या कडेवर तो येउन ठेपतो. समोर सुंदर देखावा, वरती भव्य निरभ्र आकाश आणि खाली खोल दरी. ह्या दैदिप्यमान नजाऱ्याने तो अवाक असतो, आता त्याला सर्व काही स्पष्ट दिसत असत. इथवर येइपर्यंत केलेल्या नासधुसीने तो खजील असतो. ह्या कड्यावरून कधीही पडणार ह्याची जाणीव झालेला तो त्याच्यासारख्या अनेकांना दरीत कोसळतांना बघतो, त्याच्या पाठिमागुन येणारेही तेच करणार असतात.

नदीस मिळाला का समुद्रास मिलीन झाला, मातीत झिरपला का मातीमोल झाला? कोणास ठाउक कारण तो असा हरवला की जणू त्याचा कधी लवलेशही नव्हता. जाण्याआधी त्याच स्वप्न मात्र पूर्ण करुन गेला, क्षणभर का होईना पण इंद्रधनुष्य सोडून गेला...

न-आस्तिक

Author: Rasika Mahabal / Labels: , , , ,

आईबाबांना मी नेहमीच पूजा पोथी पाठ करतांना पाहिल. श्लोकच्या श्लोक पोथ्याच्या पोथ्या माझ्या नुसत्या ऐकुन पाठ आहेत. दर वेळेला मंदिरात प्रवेश केला की खूप प्रसन्न वाटत. तिथला गंध, मृदंग, मंजुळ घंटानाद; मंदिर जुनं आणि पाण्यातिरी असेल तर मन अजून प्रफुल्लीत वाटत. पण तिथे आलेले भक्त बघितलेत की मला जाणवत ते रिकामपण. मूर्तीच्या रुपात भक्तांच निर्मितीकाराला बघण हाच कर्ता धर्ता असा अतूट विश्वास त्यांच्या डोळ्यात बघितला की ती धुंदी, ती दृढ श्रद्धा माझ्यात नाही ह्याचा मला खेद वाटतो. त्या नितांत भक्तीचा अनुभव घेण निश्चीतच विशेष असेल पण त्याचा माझ्यात लवलेशही नाही. आजूबाजूला असलेल्या प्रत्येक व्यक्तीने अनुभवली म्हणून अनुभवायची अस म्हणून ती निर्माण पण  होऊ शकत नाही. त्यामुळे मला मुर्त्यांसमोर, मंदिरांमधे भयंकर आउट ऑफ प्लेस सुध्दा वाटत.

अर्थात भारतामध्ये अस विश्वास नाही म्हणून जगण सोप्प नाही. तिथल्या संस्कृतीत दुसऱ्या विचारांना जणू स्थान नाही. तुम्ही नास्तिक म्हणून वाळीत टाकले जाउ शकता किंवा हा कोण स्वत:ला शहाणा समजतो असहि म्हटल जाउ शकत. (हा पोस्ट टाक्ण्याआधीहि मी दोन वेळा विचार केला). अतिशय धार्मिक कुटूंबात जन्माला आलात तर मग संपल. एमोशनल ब्लेकमेल करून तुम्हाला मंदिरात किंवा पूजा पाठामध्ये खेचलच जाइल. देवाच असं  केल नाही तर अघटित घडत अस मनात बिंबवल जात.  भीती दाखवुन विश्वास बसायला लावण हे कितपत योग्य आहे?  पूजाअर्चेमधे  खेचलं गेल्यास खजील वाटत असत कारण मन ओसाड आणि चेहेऱ्यावर भक्ती दाखवणं मला कोणाच्यातरी विश्वासाला, पवित्र भावनेला ठेच पोचवल्या सारखं वाटत. 

ह्या जगाची निर्मिती का झाली  ह्याच ठोस उत्तर कोणाकडेच नाहीये. जे लोक ते कळाल असण्याचा दावा करतात त्यांच्याकरता वेल एंड गुड. देवाने हे सगळ निर्माण केल तर देवाला कोणी केल?, जगाची निर्मिती, ग्रहांची निर्मिती त्यावरचे जीवजंतू, माझ येथिल अस्तित्त्व, त्या अस्तित्त्वाला काही अर्थ आहे का नाही अश्या बऱ्याच गोष्टिंवर मी विचार करते त्यावर वाचन करते. त्यामुळे देवावर विश्वास नाही म्हणणारे लोक सखोल विचारी नसतात किंवा माजोरडे असतात अस काही मला वाटत नाही, ते सुद्धा सगळ्या पौसिबिलिटिज ना कंसिडर करत असतात. कदाचित देवाधर्माच्या मार्गावरुन जाऊनही आलेले असतात. निर्मिती च उत्तर पाठ्पठनामधून मिळवाव, मनन चिंतन वा वाचनातून मिळवाव. किंवा कोणी म्हणाव मला जन्म मिळाला आहे आता मी 'अबब केवढ हे सौदर्य' अस म्हणत जगणार, ना मला कुठला प्रश्न आहे ना कुठल्या उत्तराची अपेक्षा. मला ह्या जगावर ह्या निसर्गावर विश्वास आहे त्याकरता अजून कुठल्या जगावर विश्वास न ठेउन जगणं इतकस वाइट नाहीये. देवाच्या अस्तित्त्वासारख्या मेजर गोष्टिबाबत इतर लोकांवर, व मुख्यत्वे तुमच्या पोरांवर तुमचे विचार लादु नये अस वाटत. त्यांना त्यांचे विचार असण्याच व्यक्तीस्वातंत्र मिळाव,  ते एक्स्प्रेस करण्याची मुभा द्यावी,  त्यांच्या मतांना विचांरांना तेवढच शालीन व पवित्र समजावं व त्यांच्या फक्त निसर्गावर श्रद्धा ठेवण्याच्या निर्णयाला तेवढाच मान सन्मान मिळावा अशी मी आशा करते!

दोन प्रवासी

Author: Rasika Mahabal / Labels: , ,



गोष्ट आहे दोन व्यक्तिंची
पहिला व दुसरा ही नावे त्यांची

त्यातील एक असे खुप महत्त्वाकांक्षी
आयुष्यातील छोट्या सुखांना तो त्याकरता बक्षी
दुसरा नसे यत्किंचीतही महत्त्वाकांक्षी
आनंद त्याचा वारा, समुद्र व त्यावरील पक्षी

मैत्री जमली दोघांची घनिष्ठ
बघु कोण होते त्यामधील कनिष्ठ

निघाले एक दिवस दोघे लक्ष घेऊन काशी
पहिल्यास होती ती गाठायची जरी राहिलेत ते उपाशी
दुसरयास येणारा प्रत्येक क्षण ठेवायचा होता मनाशी
एकच लक्ष पण विरुध्द व्यक्तिमत्त्वाचे हे दोन प्रवाशी

दुसरा आनंदे जेव्हा उमले कळी
किंवा कुठुनशी सरपटतांना दिसे अळी
आकाशी उठे निरनिराळ्या छटांची जाळी
पहिल्यास कळे ह्यातील धुंदी जेव्हा बघे तो दुसरयाच्या भाळी

नसे उरत दुसरयास वेळेचे भान
जिथे बघी तो फुले पाने किंवा रान
बस तिथेच मारी तो ठाण
नव्हती पहिल्यास ह्यातील काहीच जाण

पहिला म्हणी दुसरयास निघु इथुन लवकर
हे सर्व करण्यास पाहिजे तर येउ नंतर
काशी येण्यास पार करायचे आहे बरेच अंतर
ध्येयपुर्तीची मस्ती असते खुप चिरंतर

सारखाच घेत बसलो आपण जर विसावा
तर अंत नाही ह्या प्रवासा
स्वप्नपुर्तीची उन्मत्तता न येई तुझ्या निवासा
छोट्या गोष्टींतुनच मिळत असे तुला दिलासा

अजुन विचार करताय कोण होते श्रेष्ठ कोण होते कनिष्ठ?

पहिला एकटा असता तर भलेही गाठली असती त्याने गंगोत्री
दुसरा एकटाच बघत बसला असता रम्य रात्री
पहिला मुकला असता पण छोट्या सुखांस
आलीच नसती काशी दुसरयाच्या नशिबास

एकमेकांना पुरक होते हे दोन सोबती
एक दुसरयाच्या नादाने सर्वी सुख त्यांना लाभती
एकाच ध्येयाचे एकत्र हे प्रवासी
असतील तुमच्याही घरात असे दोन रहिवासी

पुस्तके

Author: Rasika Mahabal / Labels: , , ,

महाराष्ट्र देशा - उद्धव ठाकरे

महाराष्ट्रात एवढी सुंदर ठिकाण आहेत ह्याचा अविष्कार झाला. अज्ञानात सुख असते म्हणतात ते खर आहे, कारण पुस्तक वाचल्यापासून मला त्या सर्व ठिकाणांना भेट द्यावी वाटत आहे.
काही फोटो बघून अवाक व्हायला होता. गुड जॉब ठाकरे!





आणि तरीही मी! - सौमित्र

अनार्थातून अर्थ काढलेत
अर्थातून अनर्थ (रीड डबल मीनिंग)
काहीतून घडला अविष्कार
काहींवर घालावा वाटला बहिष्कार, अशा कवितांमध्ये काहीतरी सखोल गहिरा विचार असावा व तो समजायची आपली कुवत नसावी असा विचार करून सोडून दिल्या
एवढे सर्व घडले 'आणि तरीही मी!' संपूर्ण वाचून काढले.

फेब्रुवरी २०१२

Author: Rasika Mahabal / Labels: , , , , , ,


चतुर्भूज - व.पु.काळे

तस पाहील तर लघुकथा लिहिण अवघड काम आहे, ४ पानांच्या गोष्टीतून कथा पात्र उभ्या करुन त्याची वाचकाला भुरळ पाडण क्लिष्ट काम आहे. मला लघुकथा लिहायला व वाचायला खुपच आवडत, हॉलीवूड व बॉलीवूड सिनेमातील फरकाप्रमाणे वाटत. १.५ तासात संपू शकणारा सिनेमा फालतू गाणी, कॉमेडी सिन्स ने भरवून ३ तास दर्शकांचा अंत बघितल्यासारख, अर्थात सर्वच कथा लघू असू शकत नाहीत जस की इम्मॉर्टल्स ऑफ मेलूहाला खंडच्या खंड कमी पडतील.
’जो उन्हातून वणवण फिरलाय तो सावलीतल रहस्य ओळखतो. ज्यान मरण जवळून बघितल आहे त्याला जीवन कळत.’
निरनिराळी व्यक्तीचित्र व.पुंनी त्यांच्या कथांमधून मांडली आहेत. ह्या गोष्टींच मेतकूट त्यांना छानच जमल आहे. आय थिंक इट इज वपुज वन ऑफ द बेस्ट.


गणगोत - पु.ल. देशपांडे
पुलंच्या आयुष्यात आलेल्या विविध व्यक्तिचित्रांवर पुस्तक आधारित आहे, मला त्यातील व्यक्तिचित्रणांनी फारसे प्रेरित केले नाही!तुम्हाला केल्यास बघा...

आभाळ - शंकर पाटील
गावाकडल्या गोष्टी लिहिण्याकरता पाटील प्रसिध्द आहेत. मला त्यांची भाषा व गोष्टी दोन्ही भावल्या नाहीत. (मी स्वत: खेड्यापाड्यातून वाढ्ले असुनही). गावाकडच्या आयुष्याचा सार चांगल्या रितीने मांडणारे अजून कोणी लेखक आवडीचे असतील तर कळवा.

आपुलकी - पु. ल. देशपांडे

Author: Rasika Mahabal / Labels: ,





मराठी भाषेच ज्ञान असलेल्यांनी पुल वाचल नसेल तर मराठी समजण्याच्या सर्वात मोठ्या फायद्यास ते मुकले आहेत.
पु. लंची ख्याती मी काय लिहावी. त्यांच्या प्रत्येक पुस्तकातून आणि प्रत्येक वाक्यातून ते पुन: पुन: प्रभावित करतात. हे पुस्तक त्यांच्या आयुष्यात आलेल्या निरनिराळ्या लोभस व्यक्तिमत्त्वांवर आहे. त्यातील एकाही व्यक्तीबद्दल मला अ का ब माहीत नसतांना त्या माझ्या मनात तरंग उठवून गेल्यात. आपुलकीने लिहिलेल हे पुस्तक त्यातील चरित्रांबद्दल आपुलकी निर्माण करुन जाते.

ही वाट एकटीची - व पु काळे

Author: Rasika Mahabal / Labels: , ,

महाराष्ट्र पुरस्कार लाभलेल पुस्तक. जीवनातील तत्वांशी जास्तच चिकटलेल पात्र वपुंनी उभ केल आहे. प्रत्येक गोष्टीतील पात्रांच एक वेगळ आयुष्य, आगळे वेगळे विचार असतात आणि तस त्यांना वागण्याचा लेखकाने अधिकार दिला असला तरी ती पात्र वाचकांना नकोशी होवू शकतात. कधी कधी पुस्तकातील पात्रांचा वैताग आला की पुस्तक वाचु नये अस वाटत. तसच माझ झाल. शेवटी वाटेवर ती एकटी राहिली ते साहजिकच होत आणि बर झाल एकटी राहिली अस वाटून गेल.