वीर सावरकर (सिनेमा)

Author: Rasika Mahabal / Labels: , , , ,



मी स्वतःला आणि स्वातंत्र्याच्या काळात जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तिस नशिबवान मानते. भारतावर ६० वर्षांपूर्विपर्यंत विविध प्रांतांनी invasion केल. स्वातंत्र मिळवण्यास किती लोकांनी प्राणांची आहूती दिली, कितींनी इंग्रजांनी केलेले जुलुम सोसले हे कदाचित आपल्याला कधिच नाही कळणार. मला ह्या हुतात्म्यांच नवल वाटत... किती द्रुढ संकल्प आणि त्याकरता जिवाची बाजी लावायची पण तयारी. ह्या सर्व देशाच्या स्वातंत्र्याकरता लढलेल्या शुरांना माझा अगदी मनापासून नमस्कार.

हा चित्रपट सावरकर संस्थानाने जमा केलेल्या donations मधून बनवला आहे. त्यामुळे quality wise खूप expectations ठेवू नका (म्हणजे भगतसिंग वर जसे फॅंसी सिनेमे निघाले होते तसा नाहीये) सिनेमातील संवाद प्रभावित करतात. अभिनय ठिक ठाक, कुठेही भडकपणा वाटत नाही हे चांगल. टॉम आल्टर नेहमीप्रमाणे खडूस इंग्रजाच्या भूमिकेत प्रचंड प्रमाणात हॅम सिन्स देतो.
'ने मजसि ने परत मात्रूभूमिला, सागरा प्राण तळमळला, तळमळला सागरा' ह्या गाण पूर्वि ऎकलेल असून देखिल चित्रपट बघितल्यावर पहिल्यांदाच त्याचा अर्थ मला कळाला अस वाटल. गाण्याच्या बोलांतील भावना मला पहिल्यांदाच जाणवल्या. इंग्रजांनी केलेले अत्याचार, आपले काही भारतीय देशाच्या स्वातंत्र्याकरता लढत असतांना उरलेल्या जनतेने पैशाच्या, प्रतिष्ठेच्या लोभाने इंग्रजांना दिलेली साथ, १५-१६ वर्षांच्या मुलांनी सूध्दा देशाकरता केलेले त्याग, क्रांतिकारयांनी कारागारात भोगलेले त्रास सर्व बघून खूप वाईट वाटत. एक गोष्ट मला नककीच जाणवत आहे की आपल्याला एवढ्या कष्टांनी मिळालेल्या स्वांतंत्र्याला taken for granted treatment न देता स्वातंत्र्याचा respect करून त्याचा देशाच्या कल्याणाकरता उपयोग करायला हवा.

नि:शब्द झुंज - रेणू गावस्कर

Author: Rasika Mahabal / Labels: , ,



रेणूने तिचे संपूर्ण आयुष्य विविध सामाजिक कार्याकरता आणि खास करुन महिलांच्या कल्याणाकरता वाहून नेल आहे. आयुष्यभर केलेल्या सामाजिक कार्यांमधील तिच्या अनुभवांवर हे पुस्तक आहे. लेखिकेने आयुष्याशी नि:शब्द झुंज देणारया लोकांचा बराच अभ्यास केला आहे. इतरांच्या कल्याणाकरता संपूर्ण आयुष्य जुंपणारे लोक कमीच असतात. रेणूने केलेल्या कामाकरता मी तिचा आदर करते.

पूस्तकातील कथा खूप हळूहळू पकड घेतात. त्या गोष्टींमध्ये substance असला तरी सुरुवातीच्या कथा भरकटलेल्या वाटतात. आयुष्यात नाना तर्हॆचे जुलुम सहन केलेल्या लोकांच्या गोष्टी असूनसुध्दा त्या मनास स्पर्श करत नाहीत. जस की लेखिकेने रमा नावाच्या एका मुलीची गोष्ट लिहिली आहे की "कॉलेजात जाणारी रमा एका मुलाच्या प्रेमात पडली आणी त्यातूनच गरोदर राहिली. परंतू ह्यास जबाबदार मुलाने तिची फसवणूक केली व पळून गेला. रमाच्या 'कर्मठ घराला भोवळ आली'. मुलीला झालेल्या संततीस त्यांनी अनाथाश्रमात दाखल केली."

ह्यात मला न पटलेला भाग असा की कॉलेजात जाणारया शिकल्या सवरलेल्या मुलीला त्या मूलाने फसवले की तिने स्वतःचीच फसवणूक करून घेतली? तिने मूलाच्या कुटूंबाची काहीच माहीती नाही मिळवली? समाजाने काही नियम बनवले आहेत ते तोडून १८ वर्षाच्या मुलीने अभ्यास करण्याच्या वयात आपण गरोदर असण्याची बातमी दिल्यास कोणते माता पिता खुष होतील? त्यांना का म्हणे कर्मठ करार दिला?

स्वातंत्र व स्वैराचार ह्यात फरक नाहीये का?

पण हे सर्व घडल्यावर काही मूलींना त्यांच्या चूकीची जाणीव होत असेल आणि आयुष्यक्रमणा नव्याने सुरू करण्याची, आपल्या पायावर उभी राहण्याची ईच्छा होत असेल. पण समाज व संस्था भूतकाळाचा कोळसा विसरायला तयार नसुन तोच कोळसा परत उगाळत बसते. अशा स्त्रियांना संस्था आधार देतात पण त्यांना independently बाहेरच्या जगात वावरता येइल अस मार्गदर्शन देतात का? त्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढावी म्हणून प्रयत्न करतात का?

हा पॅटर्न चेंज व्हायला कदाचित भरपूर वेळ लागेल. ह्या सर्वात जन्माला येणारया मुलाची काहीच चूक नसतांना चूकीचे चटके मात्र त्यालाच भोगावे लागतात. आणि मग आईने आपल्याला पोटातच का मारुन टाकल नाही असे प्रश्न त्यांच्यासमोर उभे राहतात.

आता ही रमाची गोष्ट असो वा निशाची. गुंड व विवाहीत मनुष्य आहे हे माहीत असूनदेखिल निशा त्याच्याशी लग्न करते आणि मग त्याने मारहाण केली आपल्याला फसवले हे कोणत्या अधिकाराने म्हणते? खरच परिस्थितीच्या कुचंबणेत येऊन अनर्थ घडलेल्या, जीवन उध्वस्त झालेल्या महिलेंची उदाहरण लेखिकेने का दिली नाहियेत हा मला प्रश्न पडला. रमा, निशा सारख्या मुलींच्या मुर्खपणास समर्थन करून पुरुष जातीला नाव का ठेवली आहेत? केवळ स्वतः एक महिला आहे म्हणून...?

कधीतरी एखाद दुसरया वाक्यात रमाचे निर्णय चुकीचे होते वगैरे वाचुन माझा राग जरा शांत झाला :)
पूस्तक वाचतांना हे निश्चितच जाणवत की आपल्या सामाजिक चौकटी, त्यात कोंबून बसलेले आपले विचार, शैक्षणिक प्रक्रियेतील त्रुटी, नीतिमत्तेच्या कल्पना, सामाजिक संस्थांच स्वरुप, शाळांमधून लैंगिक शिक्षणाची गरज या सर्वांचा विचार झालाच पाहिजे.

लेखिकेने केलेले विविध प्रकारचे उपक्रम वाखाणण्याजोगे आहेत. जस की:
वेश्यांसाठी चालवलेला उपक्रम, वेश्यांच्या मुलांकरता चालवलेल्या शाळा, निरनिराळ्या शाळांमधुन मुलिंना दिलेले लैंगिक शिक्षण, दारुच्या सवयीने ग्रस्त असलेल्या पुरुषांच्या बायकांना मानसिक आधार, अनाथाश्रम व महिला कल्याण संस्थांमधिल गरजुंना दिलेला आधार आणि अजुन बरच काही.

दारुवरील गोष्ट वाचतांना मला वाटले की दारुसारख्या गोष्टीस सामाजिक प्रतिष्ठा मिळाली आहे. आजकाल सर्रास शिकली सवरलेली मंडळी पार्टीजच्या नावाखाली मद्यपान करतात, तिथे आलेली एखादी व्यक्ती करत नसेल तर ह्या घोळ्क्यात आपण 'कुल' आहोत हे दाखवायला दारु पिण सुरु करते. मग हळुह्ळु पार्टीज, गेट टुगेदरस = दारु हे इक्वेशन बनते. काही काळाने पार्टीमध्ये दारु नसल्यास त्यांना मजा कशी करायची, पार्टीतला वेळ कसा घालवायचा हेच कळत नाही. कोणी stress घालवायला तर कोणी मित्र टिकवायला दारुच्या आहारी जात राहतात. खरच enjoy करण्याकरता दारु महत्त्वाची असते का?

लेखिका म्हणते की "समाजाची भुमिका कुमारी मातांच्या बाबतीत पक्व असायला हवी" हे वाचतांना मला एक असा प्रश्न पडला की ख्ररच समाजाची भुमिका पक्व असती तर गोष्टी सुधारल्या असत्या? का बिघडल्या असत्या?
समाजाच्या भितीने अशी प्रकरण कमी होत आहेत?
समाजाची भुमिका बदलल्यास कुमारी मातांची संख्या बिनबोभाट वाढेल?

ह्यावर तुमचे काय विचार आहेत ते मला नक्की कळवा, मला जाणुन घ्यायला निश्चितच आवडेल.