वीर सावरकर (सिनेमा)

Author: Rasika Mahabal / Labels: , , , ,



मी स्वतःला आणि स्वातंत्र्याच्या काळात जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तिस नशिबवान मानते. भारतावर ६० वर्षांपूर्विपर्यंत विविध प्रांतांनी invasion केल. स्वातंत्र मिळवण्यास किती लोकांनी प्राणांची आहूती दिली, कितींनी इंग्रजांनी केलेले जुलुम सोसले हे कदाचित आपल्याला कधिच नाही कळणार. मला ह्या हुतात्म्यांच नवल वाटत... किती द्रुढ संकल्प आणि त्याकरता जिवाची बाजी लावायची पण तयारी. ह्या सर्व देशाच्या स्वातंत्र्याकरता लढलेल्या शुरांना माझा अगदी मनापासून नमस्कार.

हा चित्रपट सावरकर संस्थानाने जमा केलेल्या donations मधून बनवला आहे. त्यामुळे quality wise खूप expectations ठेवू नका (म्हणजे भगतसिंग वर जसे फॅंसी सिनेमे निघाले होते तसा नाहीये) सिनेमातील संवाद प्रभावित करतात. अभिनय ठिक ठाक, कुठेही भडकपणा वाटत नाही हे चांगल. टॉम आल्टर नेहमीप्रमाणे खडूस इंग्रजाच्या भूमिकेत प्रचंड प्रमाणात हॅम सिन्स देतो.
'ने मजसि ने परत मात्रूभूमिला, सागरा प्राण तळमळला, तळमळला सागरा' ह्या गाण पूर्वि ऎकलेल असून देखिल चित्रपट बघितल्यावर पहिल्यांदाच त्याचा अर्थ मला कळाला अस वाटल. गाण्याच्या बोलांतील भावना मला पहिल्यांदाच जाणवल्या. इंग्रजांनी केलेले अत्याचार, आपले काही भारतीय देशाच्या स्वातंत्र्याकरता लढत असतांना उरलेल्या जनतेने पैशाच्या, प्रतिष्ठेच्या लोभाने इंग्रजांना दिलेली साथ, १५-१६ वर्षांच्या मुलांनी सूध्दा देशाकरता केलेले त्याग, क्रांतिकारयांनी कारागारात भोगलेले त्रास सर्व बघून खूप वाईट वाटत. एक गोष्ट मला नककीच जाणवत आहे की आपल्याला एवढ्या कष्टांनी मिळालेल्या स्वांतंत्र्याला taken for granted treatment न देता स्वातंत्र्याचा respect करून त्याचा देशाच्या कल्याणाकरता उपयोग करायला हवा.

2 comments:

Discovering Adevntures said...

thanks a lot for an excellent write-up.

Dhananjay said...

hmm.. maza pan avadata cinema ahe ha